#लेख

सिनेमे सुलगते है अरमॉं...

सिनेमे सुलगते है अरमॉं...

'सिनेमे सुलगते है अरमॉं’ हे तलत महेमूदनं गायलेलं बैचेन करणारं गीत असो, वा ‘दूर हटो ऐ दुनियावालो’ हे प्रखर देशभक्तीपर गीत असो अनिलदांच्या संगीतस्पर्शानं त्यातलं माधुर्य वाढणारंच आहे. आज शंभर वर्ष होऊन गेली, पण तरीही भारतीय संगीताच्या इतिहासात अनिलदा म्हणजेच अनिल विश्‍वास या बंगाली संगीतकाराचं नाव ठळकपणे कोरलं गेलंय. १९३५ ते १९६५ या ३० वर्षांच्या कालावधीत अनिल विश्‍वास यांच्या दर्जेदार संगीतानं लाखो श्रोत्यांना तृप्त केलं. अनिल विश्‍वास नसते, तर मुकेश आणि तलत महेमूद यांचा हृदयाला भिडणारा आर्त स्वर आपल्यापर्यंत पोहोचलाच नसता. हिंदी चित्रपटसृष्टीचे पितामह म्हणून अनिल विश्‍वास ओळखले जातात. पुढे वाचा